जव्हार (पालघर) : केंद्र शासन पुरस्कृत श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन अभियानच्या अंमलबजावणीसाठी जव्हार तालुक्यातील ‘कासटवाडी’ समूहाची निवड करण्यात आली आहे.
आदिवासी भागातील गावसमूहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे, शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा या अभियानाचा मुख्य उदेश आहे. या योजनेंतर्गत ‘कासटवाडी’ पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाणार असून विविध शासकीय योजना येथे प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत.
या समूहांतर्गत कासटवाडी, जुनी जव्हार, डेंगाची मेट व आमरे या चार ग्रामपंचायतीतील १४ महसूल गावे व २५ पाड्यांचा समावेश आहे. शासकीय अनुदानातून विविध पायाभूत आणि जीवनोत्तीबाबत विविध प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.